फक्त भारतालाच इतिहास का आहे?
निलेश नीळकंठ ओक हे भारतीय लेखक, संशोधक आणि व्याख्याते असून रामायण व महाभारताच्या कालनिर्णयावरील संशोधनासाठी विशेष ओळखले जातात. प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी ते खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि अनुवंशशास्त्र या आधुनिक विज्ञानांचात्यांनी वापर केला आहे.
प्राचीन ग्रंथांतील ग्रह-ताऱ्यांच्या खगोलशास्त्रीय संदर्भांचे आधुनिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने विश्लेषण करून ते घटनांचा काल निश्चित करण्याचा प्रयत्न करतात.
Research Snapshot
त्यांच्या संशोधनानुसार
Mahabharata
महाभारत युद्ध
महाभारत युद्ध इ.स.पूर्व ५५६१ मध्ये झाले.
Ramayana
रामायणातील घटना
रामायणातील घटना इ.स.पूर्व १२२०९ च्या सुमारास घडल्या.

Published Works
त्यांची प्रमुख पुस्तके
When Did the Mahabharata War Happen?
The Historic Rama
Bhishma Nirvana
प्राचीन भारतीय खगोलविज्ञान (मराठी)
ऐतिहासिक राम (मराठी)
About the Speaker
निलेश नीळकंठ ओक
ते देश-विदेशात व्याख्याने देतात आणि TEDx, एबीपी माझा – माझा कट्टा, तसेच विविध मराठी व इंग्रजी पॉडकास्ट्सवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.
बीएमएम२०२६ अधिवेशनात त्यांचे 'फक्त भारतालाच इतिहास का आहे?' या उत्कंठापूर्ण विषयावर बोलणार आहेत.
Featured Thought
"पूर्ण जगामध्ये सध्या तरी आपल्याकडे जी उपलब्ध ग्रंथसंपदा आहे जगातली, त्याच्यामध्ये फक्त भारताकडेच इतिहास आहे!आपल्या प्राचीन ग्रंथांकडे श्रद्धेनेच नव्हे, तर विज्ञान, तर्क आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले, तर त्यातील ज्ञानाची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर येते. "
- बीएमएम २०२६ अधिवेशनात “फक्त भारतालाच इतिहास का आहे?” या विषयातून श्री निलेश ओक हाच विचार मांडणार आहेत.